बंद असलेली शिर्डी पंढरपूर रेल्वे पुन्हा सुरू करा
पंढरपूर प्रतिनिधी
बंद असलेली शिर्डी पंढरपूर रेल्वे पुन्हा सुरू करा वारकऱ्यांची मागणी आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असलेल्या साईबाबांची शिर्डी आणि वारकऱ्यांचे आराध्य दैवत पंढरीचा पांडुरंग विठोबा या दोन्ही श्रद्धा स्थानांना जोडणारी शिर्डी मुंबई पंढरपूर अशी जलद गती पॅसेंजर रेल्वे गाडी पाच वर्षांपूर्वी सुरू होती मात्र ती आता शिर्डी मुंबई पर्यंतच चालवली जाते त्यामुळे वारकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले असून त्यांनी ही रेल्वे सेवा शिर्डी ते पंढरपूर पर्यंत न्यावी अशी मागणी रेल्वे प्रवासी वारकऱ्यांनी संबंधित रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे एका निवेदन द्वारा केली आहे अवघ्या (110) रुपयात शिर्डी ते पंढरपूर असा प्रवास वारकऱ्यांचा होत मात्र पाच वर्षांपासून ही रेल्वे सेवा खंडित करण्यात आले आहे सदर शिर्डी पंढरपूर ही रेल्वे सकाळी पाच वाजता असायची साडेबारापर्यंत पंढरपूरला पोहोचायची मात्र ती आता बंद आहे त्यामुळे अनेक वारकऱ्यांसह भाविकांमध्ये अस्वस्थता आहे पंढरीचा पांडुरंग अनेक वारकऱ्यांचे श्रद्धास्थान आहे तर पंढरपुरातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान साईबाबांची शिर्डी आहे या दोन धार्मिक स्थळावरील भाविकांसह प्रवाशांना ही रेल्वे सेवा अत्यंत सुलभ होती पण ती सध्या शिर्डी ते मुंबई पर्यंत चालवली जाते त्यामुळे ज्या भाविकांना पंढरपूर आणि शिर्डीला ये जा करायची असते ते या सेवेपासून गेल्या पाच वर्षापासून वंचित आहेत आषाढी एकादशी काही दिवसांवर येऊन ठेवली आहे शिर्डी मुंबई पंढरपूर अशी सेवा सुरू झाली तर वारकऱ्यांसह भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते वयोवृद्ध वारकऱ्यांचं भाविकांना रेल्वेने प्रवास करणे सोयीचे वाटते त्यासाठी ते एस.टी ऐवजी रेल्वे सेवेला प्राधान्य देतात तेव्हा रेल्वे विभागाने शिर्डी मुंबई जलद गती पॅसेंजर सेवा थेट पंढरपूर पर्यंत सुरू करण्यात यावी अशी मागणी केली आहे
लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क
मोहसीन इसाक खान.
(८६०५१७१९१७).
रोहन हनुमंत हिवराळे..
( ८६६८६१००५०)
Comments
Post a Comment