पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील घटना चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

पंढरपूर तालुका प्रतिनिधी, लोकराज्य मराठी न्युज, नेटवर्क महाराष्ट्र

लक्ष्मी टाकळी येथे पत्नीच्या चारित्र्याच्या संशय घेत पतीने मध्यरात्री पत्नीवर कुऱ्हाडीने,वार करून खून केल्याची घटना घडली आहे दरम्यान पत्नीला मारहाण करताना आईला वाचवण्यासाठी आलेल्या दोन मुलांवरही वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडल्याने पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक माहिती अशी आहे की लक्ष्मी टाकळी येथील मारुती मंदिरासमोर राहणारे तानाजी जालिंदर उबाळे (वय, ४०) याने आपली पत्नी सौ पल्लवी तानाजी उबाळे (वय, ३५) हिचेवर चारित्र्याचा संशय घेऊन भांडणाला सुरुवात केली पती-पत्नीचे भांडण विकोपाला जाऊन पतीने रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यात  कुऱ्हाडीने.घाव घालून तिला जीवे ठार मारले दरम्यान पती-पत्नीचे भांडण व मारहाण सुरू असतानाच आपल्या आईला वाचवण्यासाठी त्यांची दोन लहान मुले पुढे आले असता मुलांच्या डोक्यातही त्याने कुऱ्हाडीने घाव घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे यानंतर घरातील गॅस पेटवून देऊन आग लावून मुलांना ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याबाबत तानाजी जालिंदर उबाळे यांच्याविरुद्ध मयत पत्नीचा भाऊ अभिजीत संजय जगताप याने पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे आरोपीविरुद्ध कलम,१०३(१),१०९(१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटनेचा पुढील तपास पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी, वाय मुजावर यांच्या आदेशाने पोसई वडणे हे करीत आहे,



लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क 

                      मोहसीन इसाक खान.  

                       (८६०५१७१९१७).

                     रोहन हनुमंत हिवराळे.

                       ‌ ( ८६६८६१००५०)

Comments

Popular posts from this blog

पंढरपूर येथे ४ मार्च २०२५ लाईनमन दिवस साजरा करण्यात आला.

प्रतिभाताई परिचारक नगर काँक्रिटीकरण रस्त्याचे पूजन !