राज्यात उष्णतेची लाट !
दिनांक १८/०३/२०२५
राज्यात उष्णतेची लाट येणार उन्हाळा वाढत असून पुढील काही दिवसात ४०ते ५० अंश सेल्सियस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे , त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात थंड पाणी पिणे टाळावे आणि साधे पाणी प्यावे असा सल्ला आरोग्य तज्ञांनी दिला आहे. दरम्यान सध्या इंडोनेशिया सिंगापूर आणि इतर देश उष्णतेची लाट अनुभवत आहे,तापमान 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचल्यावर खूप थंड पाणी न पिण्याच्या सल्ला डॉक्टर देतात कारण असे केल्यास आपल्या लहान रक्तवाहिन्या फुटण्याची किंवा रक्तवाहिन्या अरुंद झाल्याने स्ट्रोकचा झटका येण्याची शक्यता असते. त्याचबरोबर कडक उन्हातून घरी आल्यावर लगेच हात पाय धुवू नका त्याआधी किंवा अंघोळ करण्याआधी किमान अर्धा तास थांबा त्यानंतर अंघोळ करा असे न केल्यास त्या व्यक्तीला स्ट्रोकचा झटका येण्याची शक्यता असते व लहान मुले , वयोवृद्ध व्यक्तींना विशेष काळजी घेणे असेही आरोग्य तज्ञांनी सांगितले आहे.
लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क .
मोहसीन इसाक खान.
(८६०५१७१९१७).
रोहन हनुमंत हिवराळे.
( ८६६८६१००५०).
Comments
Post a Comment