संविधान वाचवण्याची चळवळ सुरू केली पाहिजे - प्रणिती शिंदे
.jpg)
बाबासाहेबांच्या विचारासाठी शेवटपर्यंत लढत राहू - माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे सोलापूर :- लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क काही लोकांनी घटना बदलण्याचे काम चालू केले आहे, आम्ही ते होऊ देणार नाही. बाबासाहेब आमचे जीव की प्राण आहेत. शेवटपर्यंत आम्ही बाबासाहेबांच्या कर्तृत्वासाठी विचारासाठी लढत राहू, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली आहे. आज चौदा एप्रिल 2024 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सोलापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी अभिवादन केले. यानंतर सुशीलकुमार शिंदे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी यावेळी पुढे बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले, बाबासाहेबांची जयंती म्हणजे आमचा उत्साह असतो. मी ज्या-ज्या वेळी सोलापूरला असतो, त्यावेळी येथे येऊन बाबासाहेबांच्या चरणी आमच्या श्रद्धा अर्पण करतो. त्यानंतर कामाला सुरुवात करतो. बाबासाहेब म्हणजे आमच्या देशाचा सामाजिक पाया रचणारे थोर नेते आहेत. अमेरिकेमध्ये जसे अब्राहम लिंकन आहेत, तसेच बाबासाहेब आमच्या देशाचे महान...